शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्ये असूनही आज भव्य जन एल्गार मोर्चा काढला.

आज 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जन एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, मजूर लोक उपस्थित होते.

आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचं काम मी आता करणार आहे. आता लढल्याशिवाय मी राहणार नाही. आता आंदोलन करावं लागेल. आमची युती कोणासोबत नाही झाली तरी, चालेल आता आपली संघटना दहा पट वाढली पाहीजे असं काम करायचं आहे.'' तीन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन आता आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.