'अशा लहानसहान घटना घडतच असतात' उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे बेताल विधान

'अशा लहानसहान घटना घडतच असतात' उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे बेताल विधान

प्रयागराज:  येथे सुरु असलेल्या महा कुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी मौनी अमावस्येला गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी २५ लाखांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

दरम्यान, यूपीच्या मंत्र्याचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, अशा लहानसहान घटना घडतच असतात. यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले की, "जिथे जागा असेल तिथे भाविकांनी स्नान करावे. जिथे एवढी मोठी गर्दी असेल, एवढं मोठं व्यवस्थापन असेल, तिथे अशा लहानसहान घटना घडतच असतात."

अखिलेश यादव यांनी महाकुंभात जागतिक दर्जाच्या व्यवस्थेचा दावा करणाऱ्यांनी चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.