कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार

कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार

मुंबई (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गावातील एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधी आटोपून लोक परतत असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा सांगितलं जात आहे.अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले. मृतांची ओळख पटवण्याचे आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम तातडीने सुरु झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.