धनंजय मुडेंच्या राजीनामा चर्चांना पुर्णविराम , मुंडे म्हणाले...

धनंजय मुडेंच्या राजीनामा चर्चांना पुर्णविराम , मुंडे म्हणाले...

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत असताना  विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.   सोमवारी धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेत राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार यांनी कोणतेही पुरावे अद्याप समोर न आल्याने राजीनामा स्वीकारला नसल्याचं बोललं जात होतं. अशतातच यावर स्वत:धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले मंत्री धनंजय मुंडे ?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे मुंबईत दाखल झालेत. यावेळी माध्यमांनी राजीनामा दिल्याबाबत विचारल्यावर, मी राजीनामा दिला नाही, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यामुळे आता राजीनामा दिल्याच्या चर्चांणा पुर्णविराम मिळाला आहे. 

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचंं आता जगजाहीर झालंय. फक्त विरोधी आमदारच नाहीतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही आता मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. भाजप आमदार सुरेश धस यांनी सर्वात गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. 

देशमुख कुटुंबीय घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यात 10 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी दिलीय. आरोपींचे सीडीआर तपासले असता त्यात आरोपी त्यांना मदत करणारे अन्य त्यांची साथीदार असण्याची शक्यता असून त्यांचे फोन सध्या बंद आहेत ते त्यांच्या पत्त्यावर मिळून येत नाहीत याचा तपास करायचा आहे, असा युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणामधील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संतोष देशमुखियांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.