अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विशेष अशी कोणतीही घोषणा नाही - आ. जयश्री जाधव

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विशेष अशी कोणतीही घोषणा नाही - आ. जयश्री जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अस  आमदार जयश्री चंद्रकांत जाधव या म्हणाल्या.

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असं ही आमदार जाधव म्हणाल्या.