राजेश क्षीरसागर यांच्याकडून मनपा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

राजेश क्षीरसागर यांच्याकडून मनपा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
कचरा व्यवस्थापन प्रश्नी मनपा अधिकाऱ्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम...

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

येत्या १५ दिवसांत कसबा बावडा येथील झूम प्रकल्पातील कचरा आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. 

क्षीरसागर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या झूम प्रकल्पातील कचऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कचऱ्याबाबत तातडीने नवी टेंडर प्रक्रिया राबवावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत लवकरच योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.