खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुनावले खडे बोल , ज्यांनी राजीनामा दिला....

पुणे : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तब्येत आणि सदसदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनाम्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. मला महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षाला अतिशय विनम्रपणे विचारायचे आहे. उपमुख्यमंत्री आणि भुजबळ म्हणत आहेत की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिला त्यांच म्हणण वेगळ आहे. याबद्दल स्पष्टता हवी.आज ८४ दिवस झाले आहेत. काही तथ्य तुमच्यासमोर आहेत. काल चार्जशीट फाईल झाली त्यातील फोटो बाहेर आले. या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे फोटो पाहिले असणार आहेत. तर ८४ दिवस लागले आहेत या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. राजीनामा घेण हा केंद्रबिंदु नाहीच सगळेच कटातील साथीदार आहेत.
संदीप क्षीरसागर वारंवार म्हणत आहेत की कृष्णा आंधळेचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) द्या. हा कृष्णा आंधळे गायब होतोच कसा सातवा खूनी गायब आहे. हे सर्व कटातील साथीदार आहे.यासंबंधी माध्यमांमध्ये सुरेश धस आणि दमानिया यांनी सीडीआर दाखवले आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी क्रुर हत्या सुरु असताना वाल्मिक कराडांना व्हिडिओ कॉल केलेले आहे. त्यानंतर लगेच कराडने धनंजय मुंडेंना फोन केला आहे. हे सर्व माध्यमांनी दाखवले आहे. हे सर्व जण ऐकामेकांना व्हिडिओ कॉल करत होते याचा अर्थ आम्ही काय काढायचा. ८४ दिवस ही सर्व माहिती सरकारला माहिती होती. आणि मंत्री म्हणतात मी आजारी म्हणून राजीनामा दिला. हीच ती नैतिकता असंही सुळे यांनी म्हटले आहे.