वारणा धरण क्षेत्रातील नागरिकांना दिलासा

वारणा धरण क्षेत्रातील नागरिकांना दिलासा

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : जिल्यात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आत्ता वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर बराच कमी झाल्याने , वारणा धरणातुन सुरु असलेल्या ४३०० क्युसेक विसर्ग कमी करुन  फक्त विद्युत गृह मधून १४७५ असे एकूण १४७५ क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा धरण क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.