जिल्ह्यातील इतकी बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील इतकी  बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.87 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडूकली व सांगशी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे 57 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.87 टीएमसी, तुळशी 1.71 टीएमसी, वारणा 16.66 टीएमसी, दूधगंगा 8.33 टीएमसी, कासारी 1.25 टीएमसी, कडवी 1.67 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.32 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 1.01 टीएमसी, जंगमहट्टी 0.93 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.00 टीएमसी, सर्फनाला 0.25 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.2 फूट, सुर्वे 30.6 फूट, रुई 60 फूट, इचलकरंजी 56 फूट, तेरवाड 48 फूट, शिरोळ 39 फूट, नृसिंहवाडी 37 फूट, राजापूर 26.6 फूट तर नजीकच्या सांगली  11.6 फूट व अंकली 15.4 फूट अशी आहे.