HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मनोज जरांगे पाटील ठरवणार,निवडणूक रणांगणात उडी की सत्ताधाऱ्यांना आव्हान?

मनोज जरांगे पाटील ठरवणार,निवडणूक रणांगणात उडी की सत्ताधाऱ्यांना आव्हान?

मुंबई (वृत्तसंस्था)  : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल याबाबत चर्चा चांगलीच रंगली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबतचा त्यांचा निर्णय 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्या दिवशी मराठा समाजाची बैठक अंतरवाली सराटी येथे आयोजित केली आहे, जिथे जरांगे पाटील समाजाच्या भविष्यातील निर्णयांवर चर्चा करतील.

या बैठकीत जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना देखील बोलावले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेतृत्व निवडणूक रणांगणात उतरणार का, की सत्ताधाऱ्यांच्या आमदारांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार, यावरून पुढील राजकीय समीकरणे ठरतील.

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा तीव्र

राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा आव्हान उभे राहिले आहे, ज्यामध्ये काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी, आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट सामील आहे.

राजकीय गणिते: सत्ताधारी पक्षांची सत्ता आणि विरोधकांचा संघर्ष

सद्यस्थितीत विधानसभेत 288 सदस्यांपैकी सत्ताधारी पक्षांचे 202 आमदार आहेत. यामध्ये भाजपचे 102, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 40, शिवसेनेचे (शिंदे गट) 38 आणि इतर छोट्या पक्षांचे 22 आमदार आहेत. विरोधी पक्षात काँग्रेसचे 37, शिवसेना (उद्धव गट)चे 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे 16 आणि इतर छोट्या पक्षांचे सहा सदस्य आहेत. तसेच 15 जागा सध्या रिक्त आहेत.

जरांगे पाटीलांचा निर्णय कोणाला देईल फटका?

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय सत्ताधारी पक्षांसाठी मोठा धक्का ठरू शकतो, तर विरोधी आघाडीला मराठा समाजाचे समर्थन मिळाल्यास निवडणुकीचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे जरांगे पाटीलांचा निर्णय नेमका कोणाला फायदेशीर ठरेल हे 20 ऑक्टोबरनंतर स्पष्ट होईल, आणि या निवडणुकीत मराठा समाजाचे वजन किती राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.