जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला पर्यावरणाचा संदेश
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

माझा महाराष्ट्र / वेब टीम

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सिद्धगिरी गुरुकुलम येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्तीं विकत घेऊन नागरिकांना पर्यावरणाचा संदेश दिला.

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ कणेरी हे नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असते. त्यातच आता वाढत चाललेल्या प्रदूषणावर मात म्हणून गणेशोत्सवासाठी पर्यावरणीय गोमयपासून बनवलेल्या सुबक अशा गणेश मूर्ती जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून दिल्या.

या मूर्तांच्या विसर्जनानंतरही निसर्गाला फायदा

कणेरी येथील सिद्धगिरी गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी गाईंच्या गोमय (गाईच्या शेणापासून) आणि कोंड्यापासून व नैसर्गिक रंग यापासून सुबक मूर्ती साकारलेल्या आहेत. या मूर्तीपासून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तसेच याच्या विसर्जनानंतर निसर्गाला फायदा होणार आहे. त्याचा आपण खत म्हणून वापर करू शकतो असे सिद्धगिरी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे खूप कौतुक केले. याप्रसंगी पूज्यपाद कुमार स्वामीजी, यशोवर्धन बारामतीकर, विवेक सिद्ध, सागर गोसावी, डॉ. विशाल खलाटे, सिद्धेश कांबळे आणि गुरुकुलचे विद्यार्थी उपस्थित होते.