अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या

अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या
अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे नैराश्यातून टोकाचे पाऊल

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्यन राजेंद्र पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

शहरातील शाहू नाका परिसरातील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीवरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. आर्यन हा गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक नैराश्यामध्ये होता. काल संध्याकाळी आर्यन मित्रांसोबत शाहू नाका येथील एका क्रीडांगणावर खेळायला गेला होता. तेथून घरी जातो असे सांगून तो निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तो शाहू नाका परिसरातील एका इमारतीजवळ पडलेला आढळला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.