उद्धव ठाकरेंना या निर्णयांवर बोलण्याचा अधिकार नाही-चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरेंना या निर्णयांवर बोलण्याचा अधिकार नाही-चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना काहीच काम केले नाही. अर्थसंकल्पातील निर्णय त्यांना समजत नसल्याचे त्यांनी कबूल केले आहे, त्यामुळे सरकारने घेतलेल्या विविध योजनांबाबतच्या निर्णयावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या अंमलबजावणीबद्दल माहिती दिली. अर्थसंकल्पात घेतलेले निर्णय लवकरच अंमलात आणले जातील असे ते म्हणाले. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर कठोर टीका केली आणि मंत्रालयात दोनदाच आले असल्याचा आरोप केला. बावनकुळे यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही योजनांचा अंमल करत नसल्याने त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. असं ही ते म्हणाले