बालिंगा भोगावती पुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतूक खुली

बालिंगा भोगावती पुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतूक खुली
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी शासनाला सहकार्य करावे

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने काही दिवसांपासून बंद असलेल्या करवीर तालुक्यातील बालिंगा येथील भोगावती नदीवरील  अवजड वाहनांसाठीची वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.

पुलावर पाणी आल्याने अवजड वहानांना वाहतूक बंद होती. ही वाहतूक आजपासून सुरु करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे उप अभियंता आर. बी. शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे दिली. तसेच पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळी स्प्रिंग लेवलवर गेल्यास सदर पुलावरून वाहतूक नाईलाजास्त बंद करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येईल तरी स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.