श्री.भोगावती साखर कारखान्याची निवडणूक 30 सप्टेंबर पर्यंत लांबणीवर

श्री.भोगावती साखर कारखान्याची निवडणूक 30 सप्टेंबर पर्यंत लांबणीवर

राधानगरी प्रतिनिधी -निवास हुजरे 

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार आणि मतदानाची प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात अतिवृष्टीच्या काळात येत असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करून उर्वरित प्रक्रिया पावसाळा संपल्यावर घेण्याची मागणी काही सभासदांनी सहकार प्राधिकरणाकडे केली होती.

     दरम्यान महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पावसाळ्याचे कारणास्तव उदभवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याच्या शक्यतेने आज दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन अनिल चोधरी यांनी दिला आहे. 

त्यानुसार सदर आदेशास अनुसरून श्री. भोगावती सहकारी साखर कारखाना ली. शाहूनगर परीते या कारखान्याची निवडणूकिची प्रक्रिया सुद्धा दि 30 सप्टेंबर 2023 पर्यन्त सद्यस्थितीत आहे त्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आली असून गुरुवारी होणारी छाननी रद्द झाली आहे .