उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले महिलांकडून...
![उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले महिलांकडून...](https://majhamaharashtra.in/uploads/images/202308/image_750x_64ecabf47dbbf.jpg)
पुणे : लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत , असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. . शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विविध बैठका पार पडल्या. यानंतर पत्रकार परीषदेत उपमुख्यमंत्री पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भुमिका स्पष्ट केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यायचा होता. परंतु या सगळ्या गोष्टी तपासण्यात आम्हाला वेळ कमी होता. आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आलेले आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. पण आता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असतील, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकच योजनेचा लाभ भेटणार आहे आणि हे आधार कार्ड शी लिंक करण्यात येत असून पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे.
’’शिवभोजन थाळी बंद करणार असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अजून अर्थसंकल्प मांडला नाही. तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे. या कपोकल्पित बातम्या आहेत असा काही निर्णय झालेला नाही, असं यावेळी अजित पवार म्हणाले.