अखेर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठली

अखेर पंचगंगा नदी इशारा पातळी गाठली

कोल्हापूर प्रतिनिधि: शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही ठिकाणी अनेक नद्या दुधडी भरून वाहताना दिसत आहे. सकाळी 11:00 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 39'00"( 542.00m ) फुटांवर आली आहे. तर विसर्ग 51825 Cusecs सुरू आहे.( नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00"). तर जिल्ह्यातील एकूण 84 बंधारे हे पाण्याखाली गेली आहेत. तर आज पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. राधानगरी धरण 82:69 टक्के तर काळमवाडी धरण 61:54 टक्के भरले आहे.