काँग्रेसच्या त्या सात आमदारांवर होणार कारवाई

काँग्रेसच्या त्या सात आमदारांवर होणार कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर शरद पवार गटाच्या समर्थनाने निवडणूक लढवणारे शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना केवळ १२ मतं मिळाली आहेत. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे ७ मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसचे नागपूरमधील विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी सांगितले की, या ७ विधानसभा आमदारांवर पक्षाकडून लवकरच कारवाई होणार आहे. त्यांनी नमूद केले की, या फुटलेल्या मतांमुळे पक्षाच्या रणनीतीवर गंभीर परिणाम झाला असून यासंदर्भात काटेकोरपणे तपासणी केली जाईल आणि योग्य ती पावलं उचलली जातील.या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. जयंत पाटील यांच्यावर मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षित यश मिळू न शकल्याने काँग्रेस पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने या पराभवाचं आत्मपरीक्षण करून भविष्यातील निवडणुकीसाठी अधिक मजबूत रणनीती तयार करण्याची गरज आहे.