पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली;वाहतूक बंद

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली;वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झालाय. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. वडणगे, निगवे दुमाला, भूये, भुयेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी हा बंधारा महत्वाचा आहे कारण हा रस्ता कसबा बावडा आणि शिरोली औद्योगिक वसाहतीला जोडतो.पावसामुळे या बंधाऱ्यावर पाणी आल्याने प्रशासनाने हा बंधारा वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी धोकादायक वाहतूक टाळावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.