कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पुन्हा सुरू

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पुन्हा सुरू

शाहूवाडी प्रतिनिधि : संततधार पडणाऱ्या पावसामूळं कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काल पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली होती. मलकापूर शेजारी जाधववाडी इथं २ फूट पाणी आल्यानं NHAI कडून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

मात्र, आज कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील पाणी उतरल्याने, येथील वाहतूक मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहे.