समाजाच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध राहील - खास.धनंजय महाडिक

समाजाच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध राहील - खास.धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाच्या प्रधानमंत्री पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांनीच मिळवलेला असून समाजाच्या विकासासाठी हे सरकार निश्चितपणाने कटिबद्ध राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आज बूथ रचना कार्य योजना अभियानाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      

     खासदार धनंजय महाडिक म्हणाले, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी भविष्यकाळात बूथ मजबूत केल्यास विधानसभा निवडणुकीला यश मिळवणे सोपे जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे . यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आजचा ठराव मांडला त्यास ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी अनुमोदन दिले .

  या वेळी समन्वयक राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमु सुबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, के एन पाटील, हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, संभाजी आरडे, राधानगरी अध्यक्ष विलास रणदिवे, भुदरगड अध्यक्ष अनिल तळकर, करवीर अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, पन्हाळा अध्यक्ष मंदार परितकर, गगनबावडा अध्यक्ष स्वप्निल शिंदे, आजरा अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, किरण नकाते, विजय खाडे, भरत काळे, रोहित पोवार, अमर साठे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, शीतल तिरुके, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सतीश घरपणकर, संतोष माळी, संदीप कुंभार, आजम जमादार, चंद्रकांत घाटगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी एक पेड माँ के नाम कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

     

स्वागत महानगर सरचिटणीस डॉ. राजवर्धन यांनी केले तर आभार जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मानले.