संजय राऊतांची सरकारवर टीका ,म्हणाले लाडकी बहीण योजना...

संजय राऊतांची सरकारवर टीका ,म्हणाले लाडकी बहीण योजना...

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.  यावरूच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक महिला दिन आहे. आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत एक महिलांसोबत कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कशी महिलांची काळजी घेतो, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नक्की प्रसिद्ध दिली जाते. पण महाराष्ट्राची जर अवस्था आपण काही महिन्यात पाहिली तर राज्यात होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मंत्री यामध्ये सामील आहेत, सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रूपये तुम्हाला दिले. म्हणजे महिला सुरक्षेत आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर हे सरकार संपूर्ण महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे. लाडकी बहीण योजना किती जास्त फसवी आहे हे सुद्धा आपण निवडून दिल्यानंतर पाहिले.

२१०० रूपये द्यायचे कबूल केले होते ना...!

लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार होते. संबंधित खात्याच्या ज्या मंत्रिबाई आहेत, त्या देखील महिलाच आहेत. त्यांनी ते शक्य नाही सांगितले. ही महिलांची फसवणूक असेल. लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन मिळत नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, २१०० रूपये द्यायचे कबूल केले होते ना...मग लाडकी बहीण योजना फसवी नाहीये का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.