संजय राऊत यांची मंत्री जयकुमार गोरेंवर टीका ; म्हणाले, अशा मंत्र्यांना ...

मुंबई: जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत. अशा मंत्र्यांना लाथ मारली पाहिजे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील महिलेचा छळ आणि विनंयभंग केला आहे. ही माहिती अंत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळेही महाराष्ट्र कलंकित होतो, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे पात्र पुन्हा निर्माण झाल आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पु्न्हा एकदा पिसले पाहिजे. आणि सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. तसेच असे मंत्री असतील तर महिला अत्याचाराविरुद्ध, महिलांच्या सबलीकरणावर देवेंद्र फडणवीस कसे बोलणार आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच हे प्रश्न मी अमित शाह यांच्याकडे पाठवणार असल्याचेही सांगितले.
...म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की प्रकृतीचं उत्तम आहे. काल चुरू चुरू बोलत होते. त्यांनी जे ट्विट केले त्यात त्यांना संतोष देशमुख हत्येचा धक्का बसला नाही. फडणवीसांनी राजीनामा द्या नाहीतर लाथ घालतो हे सांगितले आणि मग राजीनामा दिला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला या प्रश्नावर राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे.