Big Breaking : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ४ महिन्यात घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Big Breaking : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ४  महिन्यात घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, त्यामुळे पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई, पुणे आणि अन्य महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुकांना हिरवा कंदील मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान “तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?” असा स्पष्ट सवाल केला आणि निवडणुका थांबवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नमूद केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या, मात्र आता न्यायालयाने सांगितले आहे की निवडणुका घेण्याची तयारी सुरू करावी.

नव्या-जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या की नाही, तसेच ओबीसी आरक्षणावर अद्याप सुनावण्या सुरू राहतील. तरीही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.