HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा मोठा दावा... अनुराग खूप दारू प्यायचा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा मोठा दावा...  अनुराग  खूप दारू प्यायचा

मुंबई :  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अनुराग कश्यपबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी जेव्हा ते 'धन धना धन गोल' चित्रपटावर काम करत होते तेव्हा अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी त्यांच्यासोबत होते, पण अनुरागच्या मद्यपानाच्या सवयीमुळे शूटिंग कठीण झालं.

डिजिटल कमेंटरी यूट्यूब चॅनलमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यानविवेक अग्निहोत्री म्हणाले की, 'जेव्हा आम्ही 'गोल' चित्रपट बनवत होतो तेव्हा अनुराग कश्यप या चित्रपटाची पटकथा लिहित होता. हा चित्रपट फुटबॉलवर आधारित होता. सुरुवातीला या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रियांका चोप्रा यांना घेण्याची चर्चा होती. सगळं जवळजवळ अंतिम टप्प्यात आलं होतं, पण सैफच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या. ते वेगवेगळ्या मार्गांनी गेले. यानंतर, जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांना चित्रपटात घेण्यात आलं.'

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, 'अनुराग कश्यप त्यावेळी खूप दारू प्यायचा. आजकाल काय करतो हे मला माहित नाही, पण त्यावेळी वेळेचा आणि कामाचा योग्य हिशेब नव्हता. त्यानंतर अनुरागने विक्रमादित्य मोटवानीला आणलं. तो म्हणाला, 'माझ्याकडे एक नवीन माणूस आहे, तो माझ्यासोबत काम करतो, तो तुला मदत करेल. तू त्याला भेटत राहा.' हळूहळू अनुरागने सर्व काम विक्रमादित्याला दिलं. विक्रमादित्य खूप मोठा माणूस आहे, यात काही शंका नाही, पण मला जो चित्रपट बनवायचा होता, माझा विचार या लोकांच्या विचारांपेक्षा वेगळा होता. त्यांना चित्रपट वेगळ्या पद्धतीने बनवायचा होता.'

  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.