Union Budget 2025 : अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात ; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 : अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात ; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : वाढती महागाई, बेरोजगारी आणि घटत्या वापराच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गाला इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सवलतीची अपेक्षा आहे. महागाईनुसार वेतन आणि पगारात वाढ होत नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना अडचणी येत आहेत त्याचबरोबर, नोकरी शोधणाऱ्या तरुणांनाही सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी (३१ जानेवारी) मोठे संकेत दिले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज  १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. 

चामड्याच्या क्षेत्रासाठी विशेष योजना

भारताच्या पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी मदत करण्याव्यतिरिक्त, चामड्याशिवाय पादत्राणांसाठी योजना आहे. 22 लाख रोजगार आणि 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे.

हरित ऊर्जा आणि ईव्ही तंत्रज्ञानाला चालना

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ग्रीन एनर्जी आणि ईव्ही तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. गुंतवणूक हे आपल्या सरकारचे तिसरे इंजिन आहे.

मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना

सी फूडला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना सुरू करण्याचाही सरकारचा प्रस्ताव असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना प्रस्तावित आहे. मत्स्यनिर्यातीसाठी 60 कोटी रुपय खर्च केले जाणार

मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना

खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ‘ग्लोबल हब’ बनवण्याचे ध्येय

कापूस उत्पादकता वाढवणार

कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

आयआयटीच्या क्षमतेमध्ये विस्तार

आयआयटीची क्षमता वाढवली, 6500 जागा वाढविल्या

भारतीय भाषा पुस्तक स्कीम

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तकांसाठी डिजिटल फॉर्म

किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये झाली आहे.

बिहारमधील मखाना मंडळाची स्थापना

बिहारमध्ये मखाना बोर्ड मंडळाची स्थापना करणार. मखाना मार्केटिंगसाठी बोर्ड करण्यात येणार असून मखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी हे केले जाणार आहे. त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील.

सीतारामन यांच्या बजेट भाषणातील काही ठळक मुद्दे

  • तरुणांना रोजगार देण्यावर प्राधान्य
  • डाळींमध्ये स्वयंपूर्णतेचे ध्येय
  •  बिहारमध्ये माखाना बोर्ड स्थापन केले जाईल
  •  मच्छीमारांसाठी विशेष अर्थव्यवस्था
  •  कर, ऊर्जा आणि शहरी विकासावर लक्ष
  •  गरीब, तरुण, शेतकरी आ णि महिला शक्तीवर लक्ष
  •  लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी जणांना रोजगाराची संधी निर्माण करणार