देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाला फटका- सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाला फटका- सुषमा अंधारे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात निराशाजनक निकाल लागल्यानंतर राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर सुषमा अंधारेंनी विधान करत  देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाला फटका बसलेला आहे. भाजपाकडून कदाचित देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्याआधी आपण स्वतःहूनच बाहेर पडावे, असा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होत आहे”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

                         देवेंद्र फडणवीस हे या विधानसभेलाच काय तर पुढच्या कोणत्याही निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होऊ शकतात. पण भाजपा त्यांना यापुढे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढेही आणणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट करायचे असेल तर भाजपाकडून एकवेळ विनोद तावडे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा कधीच समोर येईल.”