मोठी बातमी:तब्बल इतके दिवस रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद!

मोठी बातमी:तब्बल इतके दिवस रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद!

रायगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण दुर्गराज रायगड किल्ला 31 जुलै 2024 पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने हा निर्णय किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घेतला आहे. काल दि ७ जुलै रोजी पावसाळ्यातील गड अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक गडावर आले होते. मात्र दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने गडावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होता.

महादरवाजा ते वाळूसरे खिंडी दरम्यानच्या पायरी मार्गावर पाण्याचे लोट वाहू लागल्याने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे लागले होते. दरम्यान, जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून 31 जुलै पर्यंत गडावर पावसाळी पर्यटनासाठी गडमार्ग बंद केल्याचे जाहीर केले पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये व कुटुंबाच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे असा आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरून केले.